उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा   

नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर गर्भगळीत झालेल्या पाकिस्तान  माध्यमांमधून खोटे दावे करत जगाची आणि विशेषत: भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा पीआयबीने फोल ठरवला आहे. 
    
पाकिस्तानची वृत्त आणि दावे यांची पीआयबीकडून सातत्याने पडताळणी सुरू आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने भारतातील उधमपूरचा हवाईतळ उ द्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. हा हवाई तळ सुरक्षित असून, असा कोणताही हल्ला पाकिस्तानकडून झाला नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. त्या वृत्तवाहिनीने प्रसारित केलेली चित्रफीत आणि समाजमाध्यमावर प्रसारित झालेेली छायाचित्रे उधमपूर हवाईतळाची नाहीत. राजस्तानच्या हनुमानगड परिसरातील एका केमिकल कारखान्याला आग लागली होती. त्याची चित्रफीत चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आली होती. सध्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमावर चुकीच्या पद्धतीने पसरवल्या जात आहेत, ज्याचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाशी काहीही संबंध नाही, असेही पीआयबीने म्हटले आहे.

Related Articles